• Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश
Monday, May 12, 2025
  • Login
No Result
View All Result
NEWSLETTER
Shrirampur Times
  • Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश
  • Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश
No Result
View All Result
Shrirampur Times
No Result
View All Result
Home अ. नगर

मी राजकारण सोडतो, अन्यथा तुम्ही सोडा

by Avinash Shinde
August 4, 2024
in अ. नगर
2.9k 29
0
मी राजकारण सोडतो, अन्यथा तुम्ही सोडा

CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v80), quality = 82

980
SHARES
7.5k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Telegram

तलाठी भरतीमध्ये पैशांचा व्यवहार झाला असा आरोप करत व्यवस्था बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. पण सरकारचा पारदर्शक कारभार असल्याने पहिल्यांदाच तलाठी भरती पारदर्शक पद्धतीने पार पडली. त्यामुळे माजी महसूल मंत्र्यांना आव्हान आहे की एकदा साईबाबांकडे या आणि बाबांच्या शपथेवर सांगा, भ्रष्टाचार झाला आहे. भ्रष्टाचाराचे एक उदाहरण जरी मिळाले तरी मी राजकारणातून बाजूला होईल आणि तुम्ही सिद्ध करु शकला नाहीत तर तुम्ही राजकारणातून बाजूला व्हा, असे जाहीर आव्हान महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस आ.बाळासाहेब थोरात यांना दिले आहे.

नगरच्या सहकार सभागृहात महसूल विभागाकडून आयोजित कार्यक्रमात आणि त्यानंतर पत्रकारांशी महसूलमंत्री विखे पाटील बोलत होते. नगर जिल्ह्यातील दोन महाभागांनी तलाठी भरती घोटाळ्यांवर माझ्यावर आरोप केले. त्यामध्ये माजी महसूल मंत्री आणि एक विद्यामान आमदार होते. त्यावेळी आम्ही विभागाच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्याचा विचार केला होता. परंतु संपूर्ण आरोपाला उत्तर म्हणून सर्व जिल्ह्यातील तलाठी उमेदवारांना नियुक्तीपत्र देऊन त्यांना मोठी चपराक लागली आहे. याचे मला समाधान आहे, अशी टीका ना विखे पाटील यांनी केली. माझ्या माहिती प्रमाणे पूर्वीच्या महसूल मंत्र्याकडे तलाठी, प्रांत अधिकारी यांच्या बदलीचे रेटकार्ड होते. मात्र, महायुती सरकारच्या काळात महसूलहस सरकारचा कारभार हा पारदर्शक पध्दतीने सुरू आहे.

यामुळे तलाठी पदाच्या नियुक्त पहिल्यांदा पारदर्शकपणे देण्यात आल्या आहेत. ज्यांच्या बुडाखाली अंधार, ज्याचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. दुसर्‍यांवर आरोप करण्यापूर्वी आपण काचेच्या घरात राहतो. याचे भान ठेवले पाहिजे, अशी टीका विखे पाटील यांनी केली. तसेच नगर शहराच्या विकासाठी पायाभूत सुविधा आवश्यक आहे. जिल्ह्यातील पहिला उड्डाणपूल नगर शहरात उभा केला. तत्कालीन खासदार सुजय विखे यांच्या प्रयत्नाने हा पूल झाला. नगर शहरात तीन पुलांचा शब्द आम्ही दिला होता. आज भूमिपूजन करून तो शब्द आम्ही पाळला आहे. नगर शहरातील वाहतूक सुरळीत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात महायुतीचे सरकारचे काम उत्तमपणे सुरू आहे. कदाचित हे काम पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यासाठी शरद पवार मुख्यमंत्री यांच्या भेटीला गेले असावेत, अशी मश्चिकील टिपण्णी त्यांनी यावेळी केली.

Avinash Shinde

Avinash Shinde

Related Posts

घडाळ्याच्या दुकानात २५ लाखांची चोरी
अ. नगर

घडाळ्याच्या दुकानात २५ लाखांची चोरी

April 19, 2025
अल्पवयीन मुलासोबत केले अनैसर्गिक कृत्य
अ. नगर

जमिनीच्या व्यवहारावरून अल्पवयीन मुलावर हल्ला; गुन्हा दाखल

April 15, 2025
अल्पवयीन मुलासोबत केले अनैसर्गिक कृत्य
अ. नगर

डोळ्यात मिरची पूड टाकली, चाकूचा धाक दाखवून कुटुंबाला लुटले

March 26, 2025
शिक्षिकेच्या पगारातून पावणेदोन लाखांचा अपहार
अ. नगर

विधानसभा तिकीटाच्या नावाखाली दीड लाखांची फसवणूक!

March 14, 2025
अहिल्यानगरमध्ये आढळले ‘जीबीएस’ संशयित चार रुग्ण
अ. नगर

अहिल्यानगरमध्ये आढळले ‘जीबीएस’ संशयित चार रुग्ण

February 4, 2025
पतंग उडवताना विहिरीत पडून मुलाचा मृत्यू
अ. नगर

पतंग उडवताना विहिरीत पडून मुलाचा मृत्यू

December 26, 2024
Facebook Instagram Youtube

Category

  • Uncategorized
  • अ. नगर
  • देश
  • महाराष्ट्र
  • श्रीरामपूर

Site Links

  • Log in
  • Entries feed
  • Comments feed
  • WordPress.org

© 2024 ShrirampurTimes - Shrirampur Times Proudly Present By Creative Corner.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश

© 2024 ShrirampurTimes - Shrirampur Times Proudly Present By Creative Corner.